काळुनदीवरील रूंदे पुल गेला पाण्याखाली

kalu river
kalu river

टिटवाळा : कल्याण तालुक्यातील ग्रामीण भागात असणारा काळू नदीवरील रूंदे पुल काल रात्रीच्या सुमारास पाण्यात खाली गेल्याने १० ते १२ गावाचा संपर्क तुटला आहे. जनजीवन विस्कळीत झाले आहे. 

काळु नदीवर असणाऱ्या रूंदे पुल १९९८ साली बांधण्यात आला होता. पुलाची साधरण लांबी 128 मीटर, रूंदी साडेसात मीटर आहे. लो लेव्हल (सब मार्शिबल) ब्रीज प्रकारात असल्याने पावसाळ्यात नेहमीच अतिवृष्टीत काळुनदीच्या पाण्याखाली पुल जातो. येथील रूंदे, आंबिवली, फळेगांव, नडगाव उशीद, मढ, दानबाव,पळसोली, शेई, अंबरजे, काकडपाडा, कुंभारपाडा, गेरसे आदी १०ते १२  गावांचा शहराशी संपर्क तुटतो.        

पाण्याखाली गेलेल्या या पुलाची उंची कमी असून नवीन पुलाच्या कामाचा प्रश्न मार्गी लागत नाही. दरम्यान वासिंद खडवली टिटवाळा भागाशी संपर्क तुटल्याने ग्रामस्थांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागले असून रूग्णांना, शालेय विद्यार्थी तसेच नोकरी व्यवसाय करणाऱ्या अनेक नागरिकांना यांचा फटका बसत असून यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. कल्याण तालुक्यातील रुंदे काळू नदीवरील यंदाच्या पावसाळ्यात आतापर्यंत ४ वेळा पाण्याखाली गेल्याने जनजीवन विस्कळीत होते. आता तरी, प्रशासनाने गंभिर्याने लक्ष देत नवीन उंच पुल बांधवा, अशी मागणी यानिमित्ताने जोर धरु लागली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com