
मुंबई : राज्यातील राज्य शिक्षण मंडळाच्या शाळांमध्ये पहिलीपासून सीबीएसईचा पॅटर्न लागू केला जातोय. यातून आपण सीबीएसईच्या धर्तीवर अभ्यासक्रम आणि त्याप्रकारच्या सोयीसुविधा आपल्या विद्यार्थ्यांना देणार आहोत. स्थानिक पातळीवरील इतिहास भूगोल, मराठी भाषा यात कुठेही बदल केले जाणार आहेत, यामुळे हे सीबीएसई पॅटर्नची अंमलबजावणी करताना सर्वस्वी अधिकार राज्याला आहेत,त्यात कुठेही तडजोड केली जाणार नाही, यामुळे या या पॅटर्नसंदर्भात कोणीही गैरसमज करून नयेत, असे आवाहन शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी आज विधानसभेत एका निवेदनाद्वारे केले. तसेच राज्यात नवीन शालेय शिक्षण धोरण आणून त्यात केल्या जाणाऱ्या बदलाची माहितीही त्यांनी यावेळी दिली.