
Agricultiral News : दोन महिन्यांपासून रब्बी हंगाम सुरु असून ठाणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात भाजीपाला लागवड केली आहे. राष्ट्रीय केमिकल फर्टीलायजर या रासायनिक खत निर्मिती करणाऱ्या कंपनीने ठाणे जिल्ह्यासाठी युरिया, सुफला ( सुधारीत नाव- भारत NPK 15-15-15)या खतांचा पुरवठा दोन महिन्यांपासून बंद केला आहे.त्यातच सध्या वारंवार बदलत्या हवामानामुळे रोपांची विकास क्षमता कमी होत आहे. योग्य वेळी खते न मिळाल्यास रब्बी पिकाच्या उत्पादनावर परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.