
राज्यात सध्या राज्यसभा निवडणुकीवरून चांगलीच खलबतं सुरू आहेत. राज्यसभेसाठीचे उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत आज दुपारी तीन वाजता संपत आहे. त्याच पार्श्वभूमीवर राज्यसभेची निवडणूक बिनविरोध करण्यासाठी मविआच्या नेत्यांचं शिष्टमंडळ देवेंद्र फडणवीसांच्या (BJP leader Devendra Fadnavis) भेटीला गेलं होतं. पण निवडणूक बिनविरोध कऱण्याचा प्रस्ताव भाजपाने फेटाळल्याने आता मुंबईत घडामोडींना वेग आला आहे.
आज संध्याकाळी ६ वाजता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी महाविकास आघाडीतल्या (Mahavikas Aghadi Government) नेत्यांची बैठक बोलावली आहे. त्यामुळे आता कोणती नवी सत्ता-समीकरणं घडणार? या बैठकीत कोणता मोठा निर्णय घेणार याकडे राज्याचं लक्ष लागून राहिलेलं आहे. राज्यसभा बिनविरोध कऱण्याचा प्रस्ताव घेऊन छगन भुजबळांसह महाविकास आघाडीचे प्रमुख नेते 'सागर'वर फडणवीसांच्या भेटीला गेले होते. त्यावेळी राज्यसभा निवडणूक बिनविरोध करण्याची मागणी या नेत्यांनी भाजपाकडे केली. याच मागणीला काऊंटर करत फडणवीसांनी बाजी पलटवली आणि मविआकडे राज्यसभा बिनविरोध करण्याची मागणी केली.
राज्यसभा निवडणुकीत घोडेबाजार होण्याचा आरोप याआधीही झाला होता. शिवसेनेच्या संजय राऊतांनीही हे बोलून दाखवलं होतं. त्या पार्श्वभूमीवर दगाफटका टाळण्यासाठी आता मविआने आमदारांना मुंबईतल्या ट्रायडंट हॉटेलमध्ये येऊन राहण्य़ाचे आदेश दिले आहेत. ८ ते १० जून या काळात या आमदारांना हॉटेलमध्ये राहण्यास सांगितलं आहे. दरम्यान, ६ जून रोजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी सर्व अपक्ष आमदारांची बैठक बोलावली आहे. त्यावेळीही खलबतं होणार आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.