'तटरक्षक दलाची सूचना धुडकाविणा-यांना शासन झालं पाहिजे'

‘ओएनजीसी’कडे कंत्राटी पद्धतीने कार्यरत असलेल्या ॲफकॉन कंपनीचे हे बार्ज होते.
Prithviraj-Chavan
Prithviraj-Chavanesakal

सातारा : ‘तौत्के‘ चक्रीवादळामुळे (tautake cyclone) अरबी समुद्रात ‘पी-३०५’ जहाज (p305 barge) भरकटले. या जहाजेवरील अनेकांचा मृत्यू झाला आहे. काहींचे मृतदेह हाती लागले आहेत तर काही जण अद्याप बेपत्ता आहेत. तटरक्षक दलाच्या सूचनांकडे दुर्लक्ष केल्याने हा प्रकार घडल्याची टीका काॅंग्रेसचे ज्येष्ठ नेते आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी केली आहे. या प्रकाराची गंभीर देखल घेऊन संबंधितांवर जबाबदारी निश्चित करुन त्यांना शासन झालं पाहिजे अशी मागणीही आमदार चव्हाण यांनी केली आहे. congress leader prithviraj chavan demands fix responsibility p305 barge missing criminal negligence compensation given

Prithviraj-Chavan
'नरेंद्र मोदी केवळ गुजरातचेच पंतप्रधान आहेत, असे वागत आहेत'

पी-३०५ हे जहाज वादळी वारे व खवळलेल्या समुद्रात भरकटले हाेते. तटरक्षक दलाच्या सूचनांचे पालन केले असते तर असे घडले नसते असे आमदार चव्हाण यांच्या म्हणणे आहे. दरम्यान सोमवारी ता.17 संध्याकाळच्या सुमारास युद्धनौका जहाजानजीक आल्या आणि खवळलेल्या समुद्रातच त्यांनी लाईफबोटींद्वारे बचावकार्य सुरू केले. या बचाव कार्यातून अनेकांना वाचविण्यात यश आले.

दरम्यान समुद्रातील तीन निवासी जहाजांना किनार्‍यावर परत येण्यास का भाग पाडले नाही? असा प्रश्न आमदार चव्हाण यांनी उपस्थित केला आहे. ते म्हणतात, ओएनजीसी’कडे कंत्राटी पद्धतीने कार्यरत असलेल्या जहाजांमध्ये सुमारे 600 पेक्षा जादा लाेक हाेते. त्यांना परत न बाेलविणा-यांवर शासन झाला पाहिजे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com