मुंबई : अजान सुरु होताच राहुल गांधींनी थांबविले भाषण

मुंबई : अजान सुरु होताच राहुल गांधींनी थांबविले भाषण

मुंबई : धारावी हेच देशाच्या विकासाचे प्रतीक आहे. मोदीजींना मान्य नसले तरी आयडिया ऑफ इंडिया हीच आहे, असे राहुल गांधी सांगत असतानाच मशिदीतून अजान सुरू झाला अन् भाषण त्यांनी थांबवले.

अजान पूर्ण झाल्यावरच त्यांनी पुढच्या भाषणाला प्रारंभ केला. मल्लिकार्जुन खर्गे धारावीच्या आमदार वर्षा गायकवाड हे राहुल गांधी यांचे हे वागणे आदराने बघत होते. तसेच उपस्थित जनसमुदायही यावेळी शांत होता. 

राहुल गांधी हे आज (रविवार) महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात उतरले. राहुल गांधी यांनी औसा, साकीनाका आणि धारावी येथे प्रचारसभा घेतल्या. मोदींनी देशाचे वाटोळे केले असा थेट आरोप त्यांनी सरकारवर केला. तसेच देशात बेरोजगारी आणि शेतीचा प्रश्न भयंकर असल्याचे त्यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com