Rahul Gandhi : कोरोना काळात व्हॅक्सीन मधून पैसे उकळले; राहुल गांधी यांचा मोदींवर गंभीर आरोप

कोरोना या महामारी ५० लाखाहून अधिक लोकांचा बळी गेला, मृतदेहांचे ढीग साचत होते. अशावेळी नरेंद्र मोदी हे व्हॅक्सीन कंपनीच्या माध्यमातून पैसे उकळत होते.
narendra modi rahul gandhi
narendra modi rahul gandhiesakal

ठाणे - कोरोना या महामारी ५० लाखाहून अधिक लोकांचा बळी गेला, मृतदेहांचे ढीग साचत होते. अशावेळी नरेंद्र मोदी हे व्हॅक्सीन कंपनीच्या माध्यमातून पैसे उकळत होते, असा गंभीर आरोप कॉंग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी केला. शनिवारी राहुल गांधी यांची भारत जोडो न्याय यात्रेदरम्यान, ठाण्यातील जांभळी नाका येथे झालेल्या सभेत गाडीवरून राहुल गांधी यांनी नागरिकांना संबोधितांना त्यांनी हा आरोप केला.

तसेच नरेंद्र मोदी हे २४ तसा जनेतची लुट करीत असून अंतरराष्ट्रीय पातळीवरील खंडणी सत्र सुरु केले असल्याचा आरोप देखील त्यांनी केला. यावेळी त्यांच्या सोबत खासदार राजन विचारे, आमदार तथा कोंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, आमदार डॉ. जितेंद्र आव्हाड आदी उपस्थित होते.

कोरोना काळात मोदी हे व्हॅक्सीन कामाप्नीच्या मध्यामौन पैसे उकळत असताना, दुसरीकडे जनतेचा थाळी वाजविण्यात मग्न केले. याबाबत कोणी बोल्यास त्याच्या मागे अमित शहा ईडी, आयकर विभागाच्या चौकशा लावत असल्याचा आरोप देखील गांधी यांनी केला. भारत जोडो यात्रेच्या माध्यामतून एकीकडे देशाला जोडत आहोत. त्याचवेळी दुसरीकडे भाजप आणि आरएसएस देशातील लोकांमध्ये भांडण लावत असल्याचा आरोप देखील त्यांनी यावेळी केला.

ईडी आणि सीबीआय या तपास यंत्रणाकडून कंपन्याना कारवाईची भीती दाखवली जात आहे. त्यांच्यावर दबाव टाकून त्या कंपन्याकडून निवडणूक रोखेच्या माध्यमातून भाजप खंडणी उखळते. बांधकाम तसेच इतर अशी मोठी कंत्राटे ज्या कंपन्याना देण्यात आली, त्यांच्याकडूनही निवडणूक रोखे स्वरूपात हफ्ते घेण्यात आले असल्याचा आरोप देखील राहुल गांधी यांनी यावेळी केला. तसेच निवडणूक रोखे हा भ्रष्टाचाराचे मोठे कुराण असल्याचे देखील त्यांनी यावेळी सांगितले.

नरेंद्र मोदींनी निवडणूक रोखेच्या माध्यमातून सामान्य जनतेचा पैसा घेतला आहे. प्रभू के गुण गाओ, आधी रोटी खाओ, और मर जाओ असा टोला गांधींनी लगावला. राम मंदिराचा सोहळा पार पडला.

या सोहळ्याच्या वेळी कोणताही शेतकरी, गरीब, आदिवासी बांधव तिथे दिसले नाही, दिसले ते अंबानी आणि अदानी यांच्यासह अरब लोक या सोहळ्याला उपस्थित होते. असे सांगत नफरत के बाजार मे आप लोगो ने मोहब्बत की दुकान खोली असे सांगत राहुल गांधी यांनी भाषणाची सांगता केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com