ग्रामीण भागातील नागरिकांना मदतीचा हात...

corona virus lockdown help to people in kalyan
corona virus lockdown help to people in kalyan

कल्याण: लॉकडाऊन मुळे अनेक व्यवसाय ठप्प झाले आहे. नाका कामगार, रिक्षाचालक व हातावर पोट असणा-या गरीबांसमोर असंख्य अडचणी उभ्या राहिल्या आहेत. एकीकडे शहरात लॉकडाऊन असतानाही लोक जीवनावश्यक वस्तू खरेदी करण्यासाठी बाहेर गर्दी करत आहेत. मात्र, शहराला लागून असलेल्या ग्रामीण भागात वस्तू खरेदी करण्यासाठी पुरेसे पैसेच नसल्याचे चित्र आहे. अशा विविध गावात रोज जाऊन तेथील नागरिकांना अन्नधान्य आणि मास्क वाटप करण्यासाठी गावातील तरुण एकवटले आहेत.

डोंबिवली नजीक असलेल्या घारीवली गावचे रहिवासी तथा माजी सरपंच योगेश पाटील यांच्या नेतृत्वाखाली आसपासच्या गावातील तरुण एकत्र आले आहेत. संकट काळात गावातील तरुणांनी एकत्र येत ग्रामस्थांना आधार दिला पाहिजे, या विचारातून सुमारे 15 ते 20 युवक रोज वेगवेगळ्या गावात जाऊन जीवनावश्यक वस्तू व मास्कचे वाटप करत आहेत. रोज एक गाव निवडले जाते. त्या गावात जाऊन मदत करण्यासाठी आम्ही 4 ते 5 मुलांचा समूह करतो. रोज नवीन समूह केले जातात. आतापर्यंत आम्ही निळजे, वाकळण, संदप, घारीवली, उसरघर या गावात 3 हजार मास्क व 600 हून अधिक कुटुंबांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप केले आहे, योगेश पाटील यांनी सांगितले.

राम पाटील, तन्मय पाटील, ओमकार पाटील,आवेश गायकर, विश्वनाथ रसाळ आदी तरुण या समूहात कार्यरत आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com