Naresh Mhaske
sakal
ठाणे - काँग्रेस सरकारच्या काळात रोज नवनविन घोटाळे उघडकीस येत होते. मात्र सुज्ञ जनतेने देशात आणि राज्यात काँग्रेस आणि त्यांच्या आघाडीला धुळ चारली असल्याची टीका शिवसेना शिंदे गटाचे खासदार नरेश म्हस्के यांनी केली.
तसेच २०१४ पूर्वी देशासमोर मोठमोठ्या प्रश्नांचे, समस्यांचे डोंगर उभे होते. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने देशाला विकासाच्या शिखरावर नेले. आज जगात आपला देश चौथ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था म्हणून नावारुपास येत असल्याचे देखील म्हस्के यांनी सांगितले.