
कल्याण - लॉकडाऊनच्या काळात केंद्र व राज्य सरकारच्या नियमांचे पालन करुन रेशनिंग दुकाने सकाळी 8 ते रात्री 8 वाजेपर्यंत सुरु ठेवण्याची मागणी आमदार गणपत गायकवाड यांनी जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांच्याकडे केली आहे. कोरोना व्हायरस प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यसरकारने 30 एप्रिल पर्यँत लॉकडाऊन जाहीर केला आहे.
यात समाधानाची बाब म्हणजे पिवळे व केशरी प्राधान्य कुटुंब शिधापत्रिकाधारकांना केंद्र शासनाच्या “ पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजने अंतर्गत पुढील तीन महिन्यांपर्यंत गोरगरिबांना 5 किलो अतिरिक्त तांदळ मोफत देण्यात येणार आहे. तसेच अन्न सुरक्षा योजने मार्फत 2 व 3 रुपये प्रति किलो धान्य मिळणार आहेत.
मात्र काही धान्य वितरक आपल्या मर्जीनुसार दुकान चालू व बंद ठेवत असल्याच्या नागरिकांच्या तक्रारी आहेत. त्यामुळे रेशनिंग दुकाने सकाळी 8 ते रात्र 8 वाजेपर्यंत सुरु ठेवावीत अशी मागणी आमदार गणपत गायकवाड यांनी जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांच्याकडे केली आहे.
गरजूंना सामाजिक संघटनांकडून मदत :
कोरोनाचे वाढते रुग्ण बघता राज्यात राज्यसरकारने 30 एप्रिल पर्यँत लॉकडाऊन सुरू राहणार आहे. त्यामुळे सर्व सामान्य कामगार, गरीब निराधार, कर्मचारी सर्व स्तरातील नागरिक हतबल झाले आहेत. या पार्श्वभुमिवर कल्याण मधील जन स्वराज्य सेवा फॉउंडेशन सामाजिक संस्था गरजूंच्या मदतीला धावून आली आहे. सस्थेचे अध्यक्ष अध्यक्ष सतीश सोनवणे, सागर भोईर, प्रकाश सोनवणे, विणेश लाडे, आदींनी कल्याण पूर्व पश्चिम मधील 62 कुटुंबाना मोफत धान्य वाटप केले.
demand for keeping ration stores open for 12 hours in kalyan
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.