
मुंबई : राज्यातील महानगरपालिका क्षेत्रात लागू करण्यात आलेल्या रात्रीच्या संचारबंदीतून हॉटेल व्यावसायिकांना वगळावे, अशी मागणी हॉटेल संघटनांनी ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्याकडे केली आहे. हॉटेल व्यावसायिकांच्या आहार संघटनेचे अध्यक्ष शिवानंद शेट्टी यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने नुकतीच पवार यांची भेट घेतली. त्यावेळी शिष्टमंडळाने आपल्या विविध मागण्या पवार यांच्यासमोर मांडल्या.
गेल्या सात महिन्यांच्या टाळेबंदीमुळे हॉटेल उद्योगाचे कंबरडे मोडले आहे. या उद्योगाला पुन्हा समर्थपणे उभे राहण्यासाठी काय करावे लागेल, याबाबत आम्ही चर्चा केली. रात्रीच्या संचारबंदीतून हॉटेलांना वगळावे किंवा निदान वेळेची मर्यादा तरी वाढवावी अशी मागणीही यावेळी करण्यात आली. सरकारने ज्याप्रमाणे परवाना शुल्कातून हॉटेलचालकांना सवलत दिली आहे, तसेच अन्य उपाय योजून हॉटेलचालकांना दिलासा द्यावा, अशीही विनंती यावेळी करण्यात आल्याचे शेट्टी यांनी सांगितले.
Demand from Sharad Pawar to exempt hotels from night curfew
--------------------------------------
( संपादन - तुषार सोनवणे )
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.