मुंबई : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जोरदार हल्लाबोल केला आहे. "होय मी बदलाच घेतला" अशा शब्दांत त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. साम टीव्हीच्या कार्यक्रमात बोलताना त्यांनी ठाकरे गटावर विविध प्रकारे भाष्य केलं. (Devendra Fadnavis attack on Uddhav Thackeray again says I took revenge)
फडणवीस म्हणाले, "उद्धव ठाकरेंनी स्वतः स्वतःचं नुकसान करुन घेतलंय. उद्धव ठाकरे हे कोणत्या मानसिकतेत काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत गेले मला माहिती नाही. त्यांना मुख्यंमत्र्याच्या खुर्चीचा एवढा मोह का झाला हे ही मला माहिती नाही. राजकारणात अनेकदा आपण युती करतो, अनेकदा आपल्याला प्रसंगानुरुप जावं लागतं. पण जेव्हा अनेकदा तुम्हाला त्यांचेच विचार मांडावे लागतात तेव्हा तुम्ही टिकू शकत नाही"
होय मी बदलाच घेतला!
जेव्हा तुमच्यासोबत २४ तास राहणारा व्यक्ती, तुमच्यासोबत सत्ता भोगणारा व्यक्ती आणि तुमच्यासोबत निवडून आलेली व्यक्ती थेट तुमच्या पाठीत खंजीर खुपसते. तेव्हा राजकारणात जिवंत राहून त्याला ते परत करावं लागतं नाहीतर तुम्हाला राजकारणात जगता येत नाही. राजकारणात चांगलंच राहिलं पाहिजे पण तुमच्या चांगुलपणाचा जर कोणी दुरुपयोग करत असेल आणि तुमच्याशी बेईमानी करत असेल तर त्याला जागा दाखवलीच पाहिजे आणि मी ती दाखवली याचा मला अभिमान आहे. जर माझ्यासोबत तुम्ही बेईमानी कराल तर त्याचा मी बदलाच घेईल आणि घेतला, अशा तीव्र शब्दांत फडणवीसांनी उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल केला.
ठाकरे गट संपला असं मी म्हणणार नाही
मला असं वाटत नाही की उद्धव ठाकरे गटाला कुठलीच सहानुभूती मिळतेय. पण आपल्या विरोधकांना कधीच कमजोर समजू नये. उद्धव ठाकरे गट संपला असं मी कधीच म्हणणार नाही. कोणीही राजकारणात संपू शकत नाही. जनताच त्यांना संपवू शकते.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.