उल्हासनगर, (जि. ठाणे) - घाम येत होता म्हणून तो क्षणभर दरवाजाजवळ गेला आणि त्या क्षणाने त्याचे संपूर्ण आयुष्यच हिरावले. दिवा-मुंब्रा लोकल मार्गावर झालेल्या अपघातात उल्हासनगर येथील २३ वर्षीय केतन सरोज याने आपले प्राण गमावले. रोजची नेहमीसारखीच सुरुवात, पण शेवट मात्र काळजाला चिरून टाकणारा ठरला. या अपघाताने केवळ एका तरुणाचे नव्हे, तर एका कुटुंबाच्या आशा-आकांक्षांचाही अंत झाला आहे.