मुंबई : कोरोनाचा संसर्गाचा धोका असल्याने नवीन वर्षाचे सेलिब्रेशनच्या पार्श्वभूमीवर मुंबईसह राज्यभरात महापालिका क्षेत्रांत रात्रीची संचारबंदी लावण्यात आलीय. ही संचारबंदी असली तरी घराबाहेर पडण्यास काही निवडक गोष्टींसाठी मुभा आहे. परंतु, गर्दी जमवू नका असे आवाहन मुंबई पोलिसांच्या वतीने करण्यात आलं आहे.
मुंबई पोलिस काय म्हणतायत ?
महत्त्वाची बातमी : खबरदार ! मांजरींना पोसाल तर 500 रुपयांचा दंड
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुंबईत संचारबंदी लागू करण्यात आली आहे. अशात चारपेक्षा अधिक जण एकत्र जमल्यास कारवाई केली जाणार आहे. नाईट कर्फ्युला अत्यावश्यक सेवा या अपवाद असणार आहेत. मात्र पब, बार आणि थिएटर्स 11 वाजता बंद करावेच लागतील असा इशारा पोलिसांनी दिला आहे. नाईट कर्फ्यूदरम्यान 5 पेक्षा अधिक लोकांनी तर चारचाकी वाहनांमध्ये 4 पेक्षा जास्त लोकांनी फिरू नये असंही आवाहन पोलिसांनी केलं आहे. नववर्षाचे स्वागत करण्यासाठी मोठ्या प्रमाणात नागरिक एकत्रगर्दी करतात. यातून संसर्ग वाढण्याचा धोका अधिक असल्याने राज्यात महापालिका पालिका क्षेत्रांत 5 जानेवारीपर्यंत रात्रीची संचारबंदी लावण्यात आली आहे.
dont worry emergency services will be available during night curfew mumbai police
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.