
डोंबिवली, (जि. ठाणे) - उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे श्रीनगरहून गोव्याला गेले, तेथून कुडाळमध्ये गेले. तिथे जल्लोष केला. हार-तुरे स्वीकारले गेले, फटाके फोडले गेले. तेव्हा त्यांच्यातील संवेदना मेली होती का? तिथे अश्रू ढाळायचे आणि कुडाळला आनंदोत्सव साजरा करायचा, अशा टीका शिवसेना (ठाकरे) नेते विनायक राऊत यांनी केली.