दहावी-बारावीच्या परिक्षांबद्दल शिक्षणमंत्र्यांचे महत्त्वाचं वक्तव्य

दहावी-बारावीच्या परिक्षांबद्दल शिक्षणमंत्र्यांचे महत्त्वाचं वक्तव्य

राज्यातील कोरोनाची वाढती आकडेवारी पाहता दहावी, बारावीची परिक्षांच्या तारखा पुढे ढकलण्यात याव्यात. कोविडची परिस्थिती आटोक्यात येताच योग्य वेळी दोन्ही परिक्षा घ्याव्यात, अशी मागणी भाजपा आमदार आशिष शेलार यांनी राज्य सरकार आणि शिक्षण विभागाकडे केली. या मागणीनंतर शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी या परिक्षांबाबत महत्त्वाचं विधान केलं. "एकीकडे अभ्यास, दुसरीकडे कोरोना अशा बिकट मानसिकतेत विद्यार्थी आहेत. शिक्षण विभागाची आणि सरकारची प्राथमिकता ही विद्यार्थ्यांचे आरोग्य हीच आहे. आम्ही गेले काही दिवस अनेकांशी चर्चा केली. विविध लोकांशी बोललो. विद्यार्थ्यांशी बोलून त्यांचीही मनस्थिती समजून घेण्याचा प्रयत्न केला. आता लवकरच शिक्षणमंत्री या नात्याने मी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्याशी चर्चा करणार आहे. त्यांना विद्यार्थ्यांच्या अडचणी समजावून सांगणार आहे. त्यांच्याशी चर्चा करून लवकरच आपण पुढील निर्णय घेणार आहोत", असे वर्षा गायकवाड यांनी स्पष्ट केलं.

"सध्या कोरोनाचा धोका वाढत चालला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्याकडे आणि सुरक्षिततेकडे लक्ष पुरवणं हीच आमची पहिली जबाबदारी असेल. मला विद्यार्थ्यांना सांगायचं आहे की तुम्ही विविध मानसिक तणावात आहात याची साऱ्यांना कल्पना आहे. पण कोणीही काळजी करू नका. तुम्ही तुमचं आरोग्य सांभाळण्याकडे लक्ष पुरवा. अभ्यासाकडे नीट लक्ष द्या. सरकार लवकरच पुढचा निर्णय कळवेल आणि तो विद्यार्थ्यांच्या मताचा विचार करूनच घेतलेला असेल", असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

भाजपची मागणी काय?

राज्यात कोरोनाने थैमान घातले आहे. त्यामुळे दहावी, बारावीच्या परिक्षांबाबत काय करावे? याबाबत आज शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी राज्याचे माजी शालेय शिक्षण मंत्री आशिष शेलार यांच्याशी दूरध्वनीवरुन चर्चा केली. यावेळी आशिष शेलार यांनी आपली भूमिका मांडतांना सांगितले की, कोविडची सध्याची भयावह स्थिती पाहता विद्यार्थ्यांच्या आरोग्याची प्रथम काळजी घेणे आवश्यक आहे. तसेच सरकारने विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक आरोग्याचीसुध्दा काळजी करणे आवश्यक आहे. त्यामुळे सद्यस्थितीमध्ये परिक्षांच्या नियोजित तारखा पुढे ढकलण्यात याव्यात. तसेच पुन्हा आढावा बैठक घेऊन योग्य वेळी परीक्षा ऑनलाईन व ऑफलाईन पध्दतीने घ्याव्यात. आता शासनाने अधिक विलंब न करता निर्णय तातडीने जाहीर करणे आवश्यक आहे, जेणेकरून पालक व विद्यार्थ्यांमध्ये असलेला संभ्रम दूर होईल, असे आशिष शेलार यांनी सूचित केले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com