मुंबई
Eknath Shinde: नऊ लाख कोटींच्या प्रकल्पांना मविआकडून ब्रेक; मुख्यमंत्र्यांचा विरोधकांवर निशाणा
Mumbai:
Mumbai News: महाविकास आघाडी सरकारने अडीच वर्षांत राज्यातील आठ लाख ८९ हजार कोटींच्या कामांना ब्रेक लावला. मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन, जैतापूर अणुऊर्जा प्रकल्प, बारसू रिफायनरी, वाढवण बंदर, धारावी पुनर्विकास, गारगाई धरण, मुंबई सेंट्रल पब्लिक पार्क अशा प्रकल्पांना स्थगिती दिली.
त्यामुळे जवळपास १४ लाख रोजगार बुडाले, शिवाय दिरंगाईमुळे प्रकल्प खर्चात १५ हजार २०० कोटींची वाढ झाली, अशा शब्दात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांवर टीका केली. विधानसभा निवडणूक प्रचार सांगतापूर्वी बाळासाहेब भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

