कामगार नसले म्हणून काय झाले; समृद्धी महामार्गाचे काम यंत्रांनी राहणार सुरू...
मुंबई : संपूर्ण देशात लॉकडाऊन असताना महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळातर्फे (एमएसआरडीसी) मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गाचे काम सुरू आहे. ठेकेदारांनी कर्नाटक, तेलंगणा, आंध्र प्रदेशातील कामगारांना गावी पाठवल्यामुळे यंत्रांच्या मदतीने शक्य असतील ती कामे सुरू करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. लॉकडाऊन संपल्यावर कामगार परत आल्यानंतर, म्हणजे मे महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासून रस्त्यांची कामे सुरू होतील, असे एमएसआरडीसीच्या एका अधिकाऱ्याने सांगितले.
कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू लागल्यावर लॉकडाऊन 3 मेपर्यंत वाढण्यात आला. सार्वजनिक बांधकाम विभागाची महत्त्वाची कामे अधिक काळ बंद राहिल्यास खर्चात वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पायाभूत प्रकल्पांची कामे सुरू करण्याचा निर्णय राज्य सरकारने काही दिवसांपूर्वी घेतला. त्यानुसार नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गाचे काम 35 टक्के पूर्ण करण्यात आले आहे. हा महामार्ग डिसेंबर 2020 मध्येच पूर्ण करण्याचा महामंडळाचा प्रयत्न आहे. समृद्धी महामार्गावर सुमारे 18 हजार कामगार कार्यरत आहेत. त्यांच्यासाठी शिबिरे उभारण्यात आली आहेत. अनेक कामे यंत्रसामग्रीवर आधारित असल्याने सोशल डिस्टन्सिंग पाळले जाईल, याची खबरदारी घेण्यात येत असल्याची माहिती अधिकाऱ्याने दिली.
सा असेल समृद्धी महामार्ग
- दोन्ही बाजूंना सर्व्हिस रोड, 50 पेक्षा जास्त उड्डाणपूल, 24 हून आधिक जोडरस्ते, 5 बोगदे.
- बोगद्यांमध्ये दिवे, पुलांचे सुशोभीकरण, डिजिटल माहिती फलक.
- सीसी टीव्ही कॅमेरे, मोफत फोन केंद्र, मोफत वाय-फाय.
- मुंबई-नागपूर हे अंतर 812 किलोमीटरवरून 700 किलोमीटर.
- प्रवासाचा काळ 14 तासांवरून 8 तासांवर.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.