School Girl
sakal
ठाणे - काही जखमा काळाने भरून निघत नाहीत; उलट काही प्रश्न काळानुसार अधिक तीव्र होतात. बदलापूरच्या ‘त्या’ चिमुरडीची कहाणीही अशीच न भरणाऱ्या जखमेची साक्ष देत उभी आहे. दोन वर्षांपूर्वी राज्याला हादरवणाऱ्या लैंगिक अत्याचाराच्या घटनेनंतर आक्रोश करण्यात आला. यातील आरोपीचा एन्काउंटरमध्ये मृत्यू झाला; पण तिच्या शालेय शिक्षणाचे आश्वासन मात्र हवेतच विरले आहे. सरकारने अजूनही तिच्या शिक्षणाची जबाबदारी स्वीकारली नसल्याने आजही तिचे भवितव्य ‘न्याय’ आणि ‘शिक्षण’ या दोन शब्दांमध्ये अडकून पडले आहे.