खर्डा किल्ल्याचे संग्रहित छायाचित्र.
खर्डा किल्ल्याचे संग्रहित छायाचित्र.

किल्ल्यांचे संवर्धन अंतिम टप्प्यात

मुंबई - राज्य सरकारने स्थापन केलेल्या गड-किल्ले संवर्धन समितीने हाती घेतलेले २८ किल्ल्यांच्या संवर्धनाचे काम आता अंतिम टप्प्यात आले आहे. त्याचप्रमाणे वेगवेगळ्या किल्ल्यांवरील ५० तोफा संवर्धित करण्यात आल्या आहेत.

ठाण्यानजीक शिरगाव, जामखेडजवळील खर्डा, तसेच गाळणा, तोरणा, माहूर, कंधार, औसा, परांडा, धारूर, आंबागड, माणिकगड या महत्त्वाच्या किल्ल्यांच्या संवर्धनाचे काम आता अंतिम टप्प्यात आहे. अनेक किल्ल्यांची तटबंदी ढासळली होती व पायऱ्यांची दुरवस्था झाली होती. पुरातत्त्व विभागाच्या मदतीने त्यांची डागडुजी करण्यात आली. पुढील टप्प्यात १४ किल्ल्यांच्या संवर्धनासाठी ४० कोटी रुपये खर्चाचा प्रस्ताव राज्य सरकारकडे पाठवला आहे, अशी माहिती गड-किल्ले संवर्धन समितीचे अध्यक्ष पांडुरंग बलकवडे यांनी दिली. वेगवेगळ्या किल्ल्यांवरील ५० तोफांच्या संवर्धनाचे काम पूर्ण झाले आहे. त्यांच्यात लोणावळ्याजवळील कोरिगड किल्ल्यावरील तोफांचा समावेश आहे.

तटबंदीजवळ तसेच परिसरात खड्ड्यांत गाडलेल्या तोफा बाहेर काढून संवर्धनाची प्रक्रिया करण्यात आली. या तोफा गाड्यांवर बसवण्यात आल्या. त्यामुळे त्या आता कायमस्वरूपी संरक्षित झाल्या आहेत, असे बलकवडे म्हणाले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com