

Maharashtra Cabinet Expands Gopinath Munde Farmer Accident Security Scheme Adds Landless Workers and Women Farmers
sakal
मुंबई : गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजनेस आणखी तीन वर्षांची मुदतवाढ देण्यास आली असून या योजनेत पात्र भूमिहीन शेतमजूर व महिला शेतकऱ्यांचा समावेश करण्याचा निर्णय मंत्रिमंडळाने आज घेतला आहे. यापूर्वी ही योजना कुटुंबातील दोनच सदस्यांना लागू होती, मात्र आता ही योजना शेतकऱ्यांच्या कुटुंबातील सर्व सदस्यांना लागू होणार आहे.