शेतकऱ्यांच्या प्रश्नाची सरकारी यंत्रणा संवेदनशीलपणे दखल घेत नाही - मुंबई उच्च न्यायालय

शेतकऱ्यांच्या प्रश्नाची सरकारी यंत्रणा संवेदनशीलपणे दखल घेत नाही - मुंबई उच्च न्यायालय
Updated on

मुंबई  : देशभरातील शेतकरी विविध समस्यांनी ग्रासलेले आहेत, पण कोणतीही सरकारी  यंत्रणा त्याची संवेदनशीलपणे दखल घेत नाही, अशा शब्दांत मुंबई उच्च न्यायालयाने एका प्रकरणात नाराजी व्यक्त केली आहे. शेतकऱ्यांना फसविल्याचा आरोप असलेल्या दोन व्यापाऱ्यांविरोधातील गुन्हा रद करण्यासही न्यायालयाने नकार दिला आहे.

जळगावमधील दोन केळी व्यापाऱ्यांनी औरंगाबाद उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. याचिकेवर न्या टी व्ही नलावडे आणि न्या एम जी सेवलीकर यांच्या खंडपीठापुढे नुकतीच सुनावणी झाली. आरोपी एम के खंडेलवाल आणि के के खंडेलवाल यांनी शेतकऱ्यांचा शेतमाल विक्री साठी घेतला होता मात्र त्याविक्रीतील शेतकऱ्यांचा हिस्सा त्यांना दिला नाही, अशी फिर्याद जळगावमध्ये नोंदविण्यात आली आहे. या प्रकरणात दोघांना सत्र न्यायालयाकडून जामीन मंजूर झाला आहे. ही फिर्याद रद्द करण्यासाठी त्यांनी उच्च न्यायालयात याचिका केली आहे. मात्र न्यायालयाने गुन्हा रद्द करण्यास नकार दिला. 

शेतकऱ्यांची परिस्थिती हलाखीची असते. त्यांच्याकडे साधने नसतात आणि अशा प्रकरणात कोर्ट कचेर्या करण्यासाठी माहिती आणि पैसेही नसतात. त्याचाच गैरफायदा घेतला जातो हे दुर्दैवी आहे, असे खंडपीठ म्हणाले. अशा घटना वाढत आहेत. पण कोणतीही यंत्रणा दुर्दैवाने त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी संवेदनशील पणे वागत नाही, अशी नाराजी न्यायालयाने व्यक्त केली. आरोपींना जामीन मिळाल्याच्या विरोधातही राज्य सरकारने अपील केले नाही, अशी टीकाही खंडपीठाने केली. शेतकऱ्यांच्या कामाचा फायदा आरोपींसारखे व्यापारी घेतात, असे म्हणत खंडपीठाने व्यापाऱ्यांविरोधात दाखल फिर्याद रद्द करण्यास नकार दिला.

जादा दराने भाव मिळेल हे पाहण्यासाठी आरोपींना शेतमाल मध्यस्थामार्फत देण्यात आला होता. याबाबत एक करारपत्रही करण्यात आले होते. मात्र शेतमाल विकल्यावर त्याचा हिस्सा देण्यास व्यापारी तयार झाले नाही. त्याबाबत मध्यस्थ दलाल व्यक्तीने पाठपुरावा केला. पण काहीच हाती न लागल्यामुळे त्यांनी फिर्याद दाखल केली. आरोपींकडून याचे खंडन करण्यात आले. आम्ही विकण्यासाठी शेतमाल घेतला नव्हता, वाहतूक करायला घेतला होता, असा बचाव त्यांनी केला. मात्र उपलब्ध कागदपत्रे पाहून खंडपीठाने हा युक्तिवाद अमान्य केला.

The government does not take the farmers seriously Mumbai High Court

---------------------------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com