विरार - वसईमधील समुद्रकिनारी संरक्षक धूप प्रतिबंधक बंधारा बनवण्याबाबत शासन निर्णय व निधी मंजूर आहे. जून महिन्यात समुद्राला मोठी भरती आल्याने अर्नाळा, नवापूर येथे गावात समुद्राचे पाणी घुसले..भुईगाव समुद्र किनारी ५०० पेक्षा जास्त झाडे मुळासकट उन्मळून पडली आहेत. रानगाव येथे शेतीत पाणी घुसले आहे. त्यामुळे मोठे नुकसान झाले आहे..याबाबत सकाळने १५ एप्रिलला 'वसई तालुक्यातील धुप्रेक्षक बंधारा कागदावर, सरकारकडून ३० कोटी रुपये मंजूर समुद्र किनाऱ्यांना विकास कामाची प्रतीक्षा अशी बातमी प्रसिद्ध करण्यात आली होती. परंतु त्याकडे दुर्लक्ष केल्याने समुद्र किनाऱ्यावरील झाडे उन्मळून पडल्याचे समोर आले आहे..जून महिन्यातील भरतीने हि स्थिती झाल्याने जुलै महिन्यात ४.५ मीटर इतकी मोठी भरती येणार आहे. त्यावेळी काय परिस्थती होईल याच्या कल्पनेने नागरिक चिंताग्रस्त आहेत. शासन दुर्घटना घडब्याची वाट पाहते का? असा प्रश्न संजीव कार्यकर्ते मॅकॅन्झी सांबरे यांनी शासनाला केला आहे. यावर शासनाने तातडीने उपाय योजना करण्याची मागणी हि त्यांनी तहसीलदाराकडे केली आहे..सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.