चूक नसल्यास राज यांना घाबरण्याची गरजच काय? : मुख्यमंत्री

Devendra-Fadnavis
Devendra-Fadnavis

मुंबई : ''मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना अंमलबजावणी संचालनालयाने नोटीस बजावली आहे, त्याबाबत मला काहीच माहिती नाही. त्यांना आलेल्या नोटीशीप्रकरणी मी पूर्ण अनभिज्ञ आहे," असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. 

कोल्हापूर, सांगलीत आलेल्या पूरामुळे तेथील जनजीवन विस्कळीत झाले होते. सध्या तेथे पुनर्वसनाचे काम सुरू आहे. आज (सोमवार) कॅबिनेट उपसमिती बैठक बोलाविण्यात आली होती. याबाबतची माहिती देण्यासाठी आयोजिक करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेमध्ये मुख्यमंत्री बोलत होते.  

मुख्यमंत्री पुढे म्हणाले, कोहिनूर प्रकरणी जर राज यांची चूक नसेल तर त्यांना घाबरण्याची काहीच गरज नाही. जर त्यांच्यावर करण्यात आलेल्या आरोपांमध्ये तथ्य नसेल, तर त्यांना तत्काळ सोडलं जाईल. राज यांच्या विरुद्ध भाजपने सूडबुद्धीने ही कारवाई केलेली नाही, असेही ते म्हणाले. 

राज यांना ईडीने नोटीस पाठविल्यानंतर राज्यभरातील मनसे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. अनेक ठिकाणी मनसे कार्यकर्त्यांनी बंद पुकारला असून येत्या 22 ऑगस्टला ठाण्यातील मनसे कार्यकर्ते रस्त्यावर उतरणार आहेत.

काय आहे नेमके प्रकरण?
मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांचे पुत्र उन्मेष जोशी यांना कोहिनूर प्रकरणात ईडीने नोटीस बजावून त्यांना 22 ऑगस्टला चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. दादरमधील कोहिनूर मिल क्रमांक तीन विकत घेण्यामध्ये राज ठाकरे यांची भूमिका असून यासाठीच ते ईडीच्या रडारवर होते. मात्र या नोटीसनंतर मनसे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com