सत्तेत असणाऱ्या शिवसेनेने धमकी देणे योग्य नाही; कोण देतंय कंगनाला संरक्षण? वाचा

सत्तेत असणाऱ्या शिवसेनेने धमकी देणे योग्य नाही; कोण देतंय कंगनाला संरक्षण? वाचा

मुंबई - सुशांत सिंह मृत्यू प्रकरणात वेळो वेळी व्यक्त होणारी अभिनेत्री कंगना रनौतने मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीरशी केल्याने तिच्यावर समाजमाध्यमांसह इतर सर्वच स्तरातून तीव्र टीका होत आहे. बॉलिवूडपासून राजकारण्यांपर्यंत सर्वांनीच तीच्या व्यक्तव्याचा चांगलाच समाचार घेतला आहे. राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी कंगनाला मुंबईत किंवा महाराष्ट्रात राहण्याचा अधिकार नाही. असे म्हटले आहे. परंतु कंगनाची पाठराखण करण्यासाठी रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष रामदास आठवले पुढे आले आहेत. त्यांनी तीला संरक्षण देण्याचे म्हटले आहे.

कंगना रानौत आणि खासदार संजय राऊत यांच्यात सुरू असलेला ट्वीट वार टोकाला गेला असताना त्यात आता रामदास आठवले यांनी उडी घेतली आहे. ते म्हणाले की, लोकशाहीत प्रत्येकाला आपले मत मांडण्याचा अधिकार आहे. अभिनेत्री कंगना राणावतला तिचे मत मांडण्याचा आणि मुंबईत राहण्याचाही अधिकार आहे. सत्तेत असणाऱ्या शिवसेनेने धमकी देणे योग्य नाही. कंगना राणावत ला आरपीआय संरक्षण देईल

कंगना रानौतच्या वक्तव्यांवरून सर्व स्तरावरून तीच्यावर टीका होत आहे. परंतु रामदास आठवले यांनी घेतलेल्या भूमीकेमुळे सर्वांनीच आश्चर्य व्यक्त केले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com