मुंबई , ता. 20: लॉक डाऊन मधून आज राज्य सरकारने सशर्त सुट दिल्यावर मुंबई शहरात आज पुन्हा गर्दी उसळली होती. रस्त्यावरही वाहानांच्या मोठ्या रांगा लागल्या होत्या. टोल नाक्यापासून थेट दादर पर्यंत आज वाहांनांची वर्दळ वाढलेली पाहायला मिळतेय. ठाणे, वाशी टोल नाक्यांवर देखील अशीच स्थिती आहे.
बांधकाम, वित्त, वैद्यकिय, ई कॉमर्स अशा विविक्षेत्रातील व्यवसायांना आज पासून सुट देण्यात आली आहे. अनेक दिवसांनी लॉक डाऊन मधून सुट मिळाल्याने शेकडो वाहाने रस्त्यावर उतरली होती. त्यातच टोल वसुली सुरु झाल्याने टोल नाक्यावर वाहानांची गर्दी झाली होती. टोल नाक्यावर पोलिस विचारपुस करुन वाहाने पुढे पाठवत होते .मात्र त्यालाही मर्यादा होत्या.
टोल नाक्यांवरुन येणार्या वाहानांमध्ये शहरातील वाहानांचीही भर पडत होती. दादर परळ या भागात नेहमी प्रमाणेच वाहानांची गर्दी झाली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आर्थिक चाकं रुळावर आणण्यासाठी ही सुट दिली असतानाच वेळो-वेळी अंदाज घेऊन या निर्णयाचा आढावा घेणार असल्याचे जाहीर केले होते. दरम्यान मुंबईत देशातील सर्वाधिक रुग्ण आढळलेले असतानाही आज वाहानांची वर्दळ प्रचंड वाढली होती. त्यामुळे मुंबईतील लॉक डाऊन संपला की काय असा प्रश्न उपस्थित होतोय.
it seems lock down in mumbai city is over read full story on lockdwon extension
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.