
सीआयआयच्या सर्वेक्षणातील निष्कर्ष
मुंबई कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे देशभरात लॉकडाऊन सुरू असल्याने मागील तिमाही व सध्याच्या तिमाहीतील नफा किमान पाच टक्के कमी होण्याची शक्यता आहे. कॉन्फेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्रीजने (सीआयआय) केलेल्या सर्वेक्षणात देशभरातील 200 कंपन्यांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी ही भीती व्यक्त केली.
लॉकडाऊनमुळे देशाच्या अर्थव्यवस्थेवर विपरित परिणाम झाला आहे. कंपन्यांचा महसूल 10 टक्के आणि नफा पाच टक्के कमी होईल, असा अंदाज या कंपन्यांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी व्यक्त केला. जानेवारीपासून सुरू झालेली ही परिस्थिती जूनपर्यंत तरी कायम राहील. लॉकडाऊन उठवल्यानंतर किमान महिनाभर मागणी कमीच राहील, अशी शक्यता त्यांना वर्तवली.
कोरोना आणि लॉकडाऊनमुळे अत्यावश्यक सेवांमधील वस्तूंचे उत्पादन व बाजारातील वितरणातही अडथळे आल्याचे सांगितले जाते. मनुष्यबळाची अनुपलब्धता व संचारबंदीमुळे ठप्प झालेली वाहतूक व्यवस्था ही यामागील मुख्य कारणे आहेत. अत्यावश्यक सेवांना लॉकडाऊनमधून वगळले असले, तरी स्थानिक पोलिसांच्या निर्बंधांचा परिणाम झाल्याचेही सर्वेक्षणातून दिसले.
सध्याच्या परिस्थितीमुळे नोकरकपात होण्याची शक्यता असल्याने सरकारने उद्योगांसाठी विशेष पॅकेज जाहीर करून त्वरेने अंमलबजावणी करण्याची गरज आहे. थंडावलेले उद्योगधंदे कधी पूर्ववत होतील, हे अनिश्चित असल्याने कामगारांच्या उपजीविकेचे साधन संकटात येण्याची शक्यता असल्याचेही हे अधिकारी
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.