love jihad case : राज्यात लव जिहादचे ४०२ प्रकरण दाखल; लव जिहाद समिती रद्द करण्याची आमदार रईस शेख यांची मागणी

तत्कालीन मंत्री मंगलप्रभात लोढा यांची माहिती चुकीची
love jihad case
love jihad caseSAkal

Mumbai News: तत्कालीन महिला व बाल विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी राज्यात लव जिहाद प्रकरणात १ लाख प्रकरण दाखल असल्याचे सांगितले होते. दरम्यान महिला बाल विकास विभागाने लव जिहाद समिती स्थापन केली होती.

या समितीने राज्यातील सर्व दाखल प्रकरणांचा अभ्यास करून तसा अहवाल सादर केला. ज्यामध्ये ४०२ प्रकरण दाखल असल्याचे माहिती अधिकाऱ्यांच्या माहिती मध्ये पुढे आले आहे. त्यामुळे आता ही समिती बरखास्त करण्याची मागणी भिवंडीचे समाजवादी पक्षाचे आमदार रईस शेख यांनी केली आहे.

यासंबंधीत शेख यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि महिला बाल विकास मंत्री अदिती तटकरे यांना निवेदन दिले आहे. ज्यामध्ये राज्यातील लव जिहाद च्या ४०२ तक्रारी मध्ये केवळ दोन विशिष्ट समुदायाची जोडपी नसून सर्वधर्मीय जोडपी असल्याचे शेख यांनी सांगितले आहे.

लव्ह जिहादबाबत समिती स्थापन करण्यामागे अल्पसंख्यांक समजाची बदनामी करणे, दोन समुदायांमध्ये तेढ निर्माण करणे आणि विशिष्ट समुदायास जाणूनबुजून त्रास देणे, असा हेतू तत्कालीन महिला व बालविकास मंत्री लोढा यांचा होता.

त्यामुळे विशिष्ट हेतूने स्थापन केलेली ही समिती व त्याबाबतचा शासन निर्णय त्वरीत रद्द करण्यात यावा,अशी मागणी आमदार रईस शेख यांनी केली आहे.

love jihad case
Dombivli News : मोटार सायकल चोर अटकेत; कल्याण गुन्हे शाखेने 5 मोटारसायकली केल्या हस्तगत

शिवाय, तत्कालीन मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी ८ मार्च २०२३ रोजी सभागृहामध्ये लव्ह जिहाद संदर्भात खोटी माहिती देवून दिशाभूल केल्याचा आरोप करत यांसदर्भात सरकारने वस्तुस्थिती स्पष्ट करण्याबाबत विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना आमदार शेख यांनी एक निवेदन दिले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com