प्रत्येक क्षेत्रात महिलांना कमी मानधन 

file photo
file photo

मुंबई : समाजातील प्रत्येक क्षेत्रात महिला आणि पुरुषांच्या मानधनात तफावत असल्याबद्दल अभिनेत्री विद्या बालन हिने खंत व्यक्त केली. मुंबई आयआयटीच्या टेकफेस्टमध्ये शुक्रवारी  ती बोलत होती.

विद्या बालनने टेकफेस्टमध्ये बोलताना देशातील पुरुषी मानसिकता अधोरेखित केली. काळानुसार महिलांची भूमिका बदलत असली, तरी त्यांना पुढे येण्यासाठी जास्त संघर्ष करावा लागतो. प्रत्येक पाऊलावर महिलेला मागे टाकण्याचा प्रयत्न केला जातो. बॉलीवूड असो किंवा समाजातील अन्य कोणतेही क्षेत्र; परिस्थिती फारशी वेगळी नाही. म्हणून महिलांनी स्वत:च सक्षम होण्याची गरज आहे, असे मत तिने व्यक्त केले.

विद्याचा "शकुंतला देवी' चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे. त्याबाबत बोलताना, गणिततज्ज्ञ शंकुतला देवी काळाच्या पुढे विचार करणारी स्त्री होती, असे गौरवोद्‌गार विद्याने काढले. 
यावेळी भूतानचे माजी पंतप्रधान दाशो तेशरिंग तोबग्या यांचेही व्याख्यान झाले. समाजमाध्यमांचा वाढलेला पसारा आणि जागतिकीकरणातही भूतानने स्वत:ची संस्कृती टिकवली आहे. वातावरणातील बदलांचे अनिष्ट परिणाम रोखण्यासाठी भूतानने तंत्रज्ञानाचाच वापर केला. त्यामुळे भूतान सर्वांत सुखी देश ठरला आहे, असे त्यांनी सांगितले. 

अभ्यासक, तज्ज्ञांनी राजकारणात यावे 
केंद्रीय मंत्री तथा ऑलिम्पिक पदकविजेते कर्नल राजवर्धन राठोड यांनी भारतीय राजकारणाबाबत भाष्य केले. अभ्यासक, तज्ज्ञांनी राजकारणात सहभागी होऊन बदल घडवावेत, असे आवाहन त्यांनी केले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com