
मराठा समाजाच्या आरक्षणासाठीचा लढा यशस्वी ठरला आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखालील आंदोलनाने सरकारला मागण्या मान्य करण्यास भाग पाडले. ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संयमपूर्ण नेतृत्वाचे कौतुक केले आहे. मात्र, त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अनुपस्थितीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.