मुंबई महापालिकेचे आयुक्त अजोय मेहता यांच्या मते पर्जन्य जलवाहिन्यांच्या आऊटलेटवर आणि पंपिंग स्टेशनच्या पंपांमध्ये आलेल्या प्लास्टिकच्या बाटल्या आणि पिशव्यांमुळे पाण्याचा निचरा करताना अडचणी येत होत्या आणि यामुळे परवा मुंबई तुंबली.
हे खरे असेल तर मुंबईच्या सर्व राजकीय पक्षाच्या नेत्यांनी, कार्यकर्त्यांनी आणि महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी अभ्यासदौरा काढण्याची गरज आहे. भाजपचे शासन असलेल्या राजस्थानची राजधानी जयपूरचा! जयपूर शहरात एकही प्लॅस्टिकची पिशवी एकाही दुकानातून तुम्हाला ग्राहक म्हणून सापडणार नाही.
जो शहरभर साचलेला कचरा पावसाच्या पाण्यात तरंगताना दिसत होता, तो मुंबई तुंबण्याला कारणीभूत असेल तर त्याच दौऱ्यात जयपूरच्या कचऱ्याची समस्या कशी सोडवली गेली याचाही अभ्यास करायला हवा.
काही ठळक गोष्टी ज्या या अभ्यासदौऱ्यात बघता येईल त्या अशा :
आता मुंबई महापालिकेचे आयुक्त, महापौर, प्रशासन आणि समस्त राजकारणी मंडळींनी खालील प्रश्नांची प्रामाणिक उत्तरे द्यावी:
सत्ताधारी राजकीय नेते आणि प्रशासनातील अधिकाऱ्यांनी अजिबात शब्दच्छल न करता याची उत्तरं दिलीत तर नेमक्या उपाययोजना कळतील आणि जर त्या प्रामाणिकपणे करायच्या असतील तर त्यावर कार्यवाही करता येईल.
नाहीतर मुंबई आणि ठाणे महापालिकांत जो कारभार सुरू आहे तो असाच सुखेनैव सुरू राहील आणि जरा जास्त पाऊस झाला की मुंबई आणि ठाण्यातील लोकांचे असेच हाल होत राहतील. मग नागरिकांच्या हतबलतेतून जन्माला येणाऱ्या तथाकथित मुंबई स्पिरिटच्या कथा जन्माला येतच राहतील.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.