मुंबईचा विकास आराखडा मार्च महिन्यातच येणार - मुख्यमंत्री

Devendra Fadanavis
Devendra Fadanavis

मुंबई : मुंबई महापालिकेने पाठवलेल्या विकास आराखड्याला याच महिन्यात म्हणजे मार्चमध्ये मान्यता देणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत केली.

विधानसभेत मुंबई शहरातील प्रश्नासंबंधी शिवसेनेचे विधानसभा प्रतोद सुनिल प्रभू यांनी नियम 293 अन्वये प्रस्ताव दाखल केला होता. त्या प्रस्तावावर शासनाच्या वतीने निवेदन करताना मुख्यमंत्री विधानसभेत बोलत होते.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, "मुंबई महापालिकेने पाठवलेल्या विकास आराखड्याला याच महिन्या म्हणजे मार्च महिन्यात मान्यता देणार आहे. राज्य सरकारने नेमलेल्या छाननी समितीच्या माध्यमातून आराखड्यावर काम सुरू आहे. ज्या ठिकाणी न्यायालय व तांत्रिक अडचणी असतील अशा मोकळ्या जागा वगळता बाकी ठिकाणी आराखडा ठरवण्यात येईल.

कोळीवाडे, पाडे यांचे गावठाणांचे सिमांकन करण्याचे काम सुरू आहे. जर यात काही पाडे कोळीवाडे सुटले तर त्यासाठी महापालिका आयुक्तांचे प्राधिकरण नेमण्यात येणार येईल. महापालिकेने वैधानिक कार्यवाही करून प्रस्ताव पाठवा तर पाचशे ते सातशे फुटांपर्यंतच्या घरांना मालमत्ता करात राज्य सरकार सुट देईल. मुंबईत गेल्या काही दिवसात छोट्या मोठ्या 15 ठिकाणी आगी लागल्या आहेत. त्यापैकी दोन मोठ्या घटनांची चौकशी चालू आहे. त्यापैकी भानूप्रसाद फरसाण व कमला मिल कंपाऊंडची घटना आहे. ज्याचा तपास सुरू असल्याचे मुख्यमंत्र्यांनी नमूद केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com