राज ठाकरेंनी मानले पंतप्रधान मोदींचे आभार

नेमकं काय घडलं?
raj-modi
raj-modifile photo

मुंबई: राज्यात सध्या कोरोनाचा कहर सुरु आहे. मागच्या काही दिवसांपासून राज्यात दररोज ५० हजारपेक्षा जास्त कोरोनाबाधितांची नोंद होत आहे. राज्यात आतापर्यंत कोरोनामुळे ५० हजारपेक्षा जास्त नागरिकांचा मृत्यू झाला आहे. कोरोनाची ही दुसरी लाट थोपवण्यासाठी ठाकरे सरकारने लॉकडाउन सदृश्य निर्बंध लागू केलेत. राज्य सरकारने कोरोनाची ही साखळी मोडण्याला 'ब्रेक द चेन'चे नाव दिले आहे. कोरोनाची ही दुसरी लाट थोपविण्याचा सध्या तरी लसीकरण हा एकमेव उपाय दिसत आहे.

महाराष्ट्रात लसीकरण वेगात सुरु आहे. दररोज ६ लाखापर्यंत नागरिकांचे लसीकरण करण्याचा सरकारचे लक्ष्य आहे. मागच्या आठवड्यात सरकारची तयारी असूनही लसीचा तुटवडा निर्माण झाला होता. राज्यातील या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहून काही मागण्या केल्या होत्या. त्यात परेल येथील हाफकिन संस्थेला लस निर्मितीची परवानगी द्यावी, अशी मागणी केली होती. राज ठाकरेंची ही मागणी मोदी सरकारने मान्य केली आहे. त्याबद्दल राज ठाकरेंनी पंतप्रधान मोदींचे आभार मानलेत.

पत्रात काय मागणी केली होती?

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पंतप्रधान मोदी यांच्याकडे पत्राद्वारे मागणी केली होती. राज्यातील कोरोनास्थिती बिकट असल्याने अशा परिस्थितीत १०० टक्के लसीकरण गरजेचे आहेत. त्यामुळे सर्व वयोगटातील नागरिकांना लसीकरणाची परवानगी द्यावी. तसेच लसींचा पुरवठा वेळेत व्हावा म्हणून महाराष्ट्रातील इतर संस्थांना, उदा. हाफकिन व हिंदुस्थान अँटिबायोटिक, यांना लस उत्पादन करण्यासाठी मुभा द्यावी, अशी मागणी राज ठाकरे यांनीही केली होती.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com