

The party has demanded that the government withdraw the GR and reconsider the recruitment policy affecting direct officer recruitment.
Sakal
मुंबई : भाजपाचे सरकार जेन-झी विरोधी आहे. नीट पेपर फुटी प्रकरण अद्याप ताजे असताना राज्यातील भाजपा महायुती सरकारने या तरुणाईंच्या स्वप्नांवर, आशा अकांक्षांवर वरवंटा फिरवला आहे. एमपीएससी मधून सरळ सेवा भरतीतून थेट अधिकारी होण्याचे तरुणांचे स्वप्न भाजपा सरकारच्या नव्या जीआरमुळे अंधाकारमय झाले आहे. अधिकारी भरतीचे ६०-४० प्रमाण बदणारा जीआर सरकारने आणला असून हा अन्यायकारक जीआर तातडीने रद्द करावा, अन्यथा जेन-झी व तरुणाई पुन्हा रस्त्यावर उतरून सरकारला सळो की पळो करून सोडेल, असा इशारा काँग्रेसचे वरिष्ठ प्रवक्ते अतुल लोंढे यांनी दिला आहे.