मुंबई : मुंबईत गणेशोत्सवाचा (Ganpati festival) सण आनंदात साजरा झाल्यानंतर पुढचे दोन आठवडे महत्त्वाचे असून परतीच्या प्रवासातून आलेल्यांवर लक्ष ठेवण्याची गरज असल्याचे आवाहन राज्य टास्क फोर्सच्या (corona task force) सदस्यांनी केले आहे. गेल्या सव्वा महिन्यांपासून पुन्हा एकदा सक्रिय रुग्णांमध्ये (corona active patients) वाढ झाली आहे. त्यामुळे, निर्बंध जरी शिथील असले तरी चाचण्या (corona test), संपर्क ट्रेसिंग, निदान आणि उपचार होण्यावर भर दिला पाहिजे. शिवाय, सौम्य लक्षण (corona symptoms) असणाऱ्यांचेही आयसोलेशन केले गेले पाहिजे असेही टास्क फोर्सकडून सुचवण्यात आले आहे.
गणेशोत्सवाच्या काळात किंवा त्या आधीपासून मुंबईतील रुग्णसंख्या 450 ते 500 च्या दरम्यान स्थिर आहे. गेल्या 10 दिवसांत मृत्यूसंख्या ही 10 च्या आत आहे. दरम्यान, मुंबईत सप्टेंबर महिन्यात ऑगस्टच्या तुलनेत जवळपास 50 टक्क्यांनी वाढ झाली असली तरी मृत्यूंमध्ये 38 टक्के घट नोंद करण्यात आली आहे. आकडेवारीनुसार, 1 ते 17 सप्टेंबर दरम्यान, मुंबईत सुमारे 7,407 कोविड -19 रुग्णसंख्या नोंदली गेली. ऑगस्टमध्ये याच कालावधीत 4,943 रुग्ण नोंद झाले होते. तर, 10 ते 19 सप्टेंबर या कालावधीत 4,173 नोंद झाले आहेत. याचा अर्थ रुग्णसंख्या हळूहळू वाढत असून आताच लक्ष केंद्रीत करणे गरजेचे आहे. सक्रिय रुग्णांच्या संख्या दुप्पट झाल्याने आरोग्य विभाग अधिकाऱ्यांची चिंता वाढली आहे. त्यातही एक दिलासादायक बाब म्हणजे मुंबईतील मृत्यू सध्या एक अंकी आहेत. त्याचप्रमाणे, गेल्या दहा दिवसांत सक्रिय रुग्णांची संख्या 3 हजारांवरुन साडे चार हजारांच्या पुढे गेली आहे. सध्या 4,629 एवढे सक्रिय रुग्ण आहेत.
दोन आठवडे काळजीचे
राज्य कोविड टास्क फोर्सचे सदस्य डॉ. राहुप पंडीत यांनी सांगितले की, आता पुढचे दोन आठवडे प्रत्येकाला काळजी घेणे गरजेचे आहे. सध्या मृत्यू कमी आहेत पण, रुग्णसंख्या आणि सक्रिय रुग्ण वाढले आहेत. त्यामुळे, जास्तीत जास्त संपर्क ट्रेसिंग आणि चाचण्या, तात्काळ निदान झाले पाहिजे. आणि कोविड वर्तणूक आता आणखी कठोर पद्धतीने पाळली पाहिजे.
सक्रिय रुग्ण दुप्पट
ही सध्या दुसरी लाट सुरू असून रुग्णसंख्या कमी असली तरी सक्रिय रुग्ण दुप्पट झाले आहेत. लसीकरणाचा वेग चांगला आहे. गणेशोत्सवानंतर मुंबईत परतलेल्या लोकांवर लक्ष ठेवले पाहिजे. तिथून डेल्टा प्लस किंवा इतर व्हेरिएंट समोर येतो का हे पाहिले पाहिजे. कोणालाही लक्षणे जाणवत असतील तर आयसोलेट करुन त्यांच्यावर उपचार करणे गरजेचे आहे, यातही मृत्यू कमी असल्याने ही संख्या अजूनही नियंत्रणात आहे, गंभीर होण्याचे प्रमाण कमी आहे, असे मृत्यू विश्लेषण समितीचे प्रमुख डॉ. अविनाश सुपे यांनी सांगितले. अतिरिक्त महापालिका आयुक्त सुरेश काकाणी यांनी सांगितले, “ 5 ऑक्टोबरपर्यंतचा कालावधी महत्त्वपूर्ण आहे. कारण, जे गणेशोत्सवासाठी गेले आहेत. त्यामुळे, चाचण्या वाढवण्या वर भर दिला गेला आहे. येणाऱ्यांवर पालिकेचे लक्ष असेल.
10 दिवसांची आकडेवारी (10 ते 19 सप्टेंबर)
रुग्ण मृत्यू सक्रिय रुग्ण
441 5 4,537
365 4 4,666
354 7 4,823
347 6 4,744
367 5 4,696
514 4 4,602
446 2 4,654
434 3 4,658
485 6 4,739
420 5 4,629
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.