BMC ला हवे मुंबईचे पालकत्व! आयुक्तांनी नक्की काय प्रस्ताव दिला सरकारला?

BMC ला हवे मुंबईचे पालकत्व! आयुक्तांनी नक्की काय प्रस्ताव दिला सरकारला?

मुंबई  : मुंबई महापालिकेत अनेक प्राधिकरणे आहेत, अशी खंत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री होण्यापूर्वी अनेक वेळा व्यक्त केली आहे. आता महापालिका आयुक्त इक्‍बालसिंह चहल यांनी मुंबईतील एकमेव प्राधिकरण म्हणून महापालिकेला मान्यता द्यावी, असे पत्रच राज्य सरकारला पाठवले आहे. भाजप सरकारच्या काळात म्हाडा वसाहतीतील इमारतींच्या पुनर्विकासाठी म्हाडाची प्राधिकरण म्हणून नियुक्ती केल्याचा आर्थिक फटका पालिकेला बसला आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 

मुंबईत मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण, म्हाडा, राज्य औद्योगिक विकास महामंडळ, झोपडपट्टी पुनर्विकास प्राधिकरण अशा राज्य सरकारच्या प्राधिकरणांसह मुंबई पोर्ट ट्रस्ट हे केंद्र सरकारचे मोठे प्राधिकरण आहे. या प्राधिकरणांच्या अखत्यारीत असलेल्या भागावर महापालिकेचे नियंत्रण नाही; मात्र त्यांना पाणीपुरवठा, मलनिःसारण, रस्ते, दिवाबत्ती, घनकचरा व्यवस्था या व अशा विविध प्राथमिक सुविधा महापालिका पुरवते. त्यामुळे पालिकेचे आर्थिक नुकसान होत आहे. तसेच या भागांतील पायाभूत समस्या सोडवताना नागरिकांनाही त्रास होतो. त्यामुळे एकच प्राधिकरण असल्यास नागरिकांच्या या समस्या सोडवणेही सोपे होईल.

कफ परेड, नरिमन पॉईंट हा भाग महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या अखत्यारीत आहे. तेथील नागरिकांकडून याबाबत वेळोवेळी मागणीही करण्यात आली होती, असेही आयुक्तांनी सांगितले आहे. उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री होण्यापूर्वी वेळोवेळी मुंबई महापालिकेला सर्व अधिकार मिळण्याची मागणी केली होती. खासकरून मुंबई तुंबल्यावर, नालेसफाईबाबत प्रश्‍न उपस्थित झाल्यावर तसेच रस्त्यांच्या खड्ड्यांवरून टीका झाल्यावर ठाकरे यांनी ही भूमिका मांडली होती. 

अनेक नियोजन प्राधिकरणे असल्याने तेथील नागरिकांच्या समस्याचे निराकरण करणे अशक्‍य झाले आहे. यासाठी मुंबईत एकच प्राधिकरण असणे योग्य आहे. एकाच छताखाली वेगवान विकासाची सुविधा देणे आणि इतर प्राधिकरणांच्या ताब्यातील भागात राहणाऱ्या नागरिकांच्या समस्या सोडविणे यामुळे शक्‍य होईल. 
- इक्‍बालसिंह चहल,
पालिका आयुक्त 

-----------------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे ) 

mumbai latest marathi news government asking it to recognize BMC as the only authority in Mumbai

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com