मुंबईकरांना होणाऱ्या पाणीपुरवठ्याबद्दल महत्त्वाची बातमी

सध्या विविध तलावांमध्ये असलेल्या पाणीसाठ्यानुसार पालिकेने व्यक्त केला अंदाज
Water-Supply
Water-Supply

मुंबई: शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या सात तलावांमध्ये 4 लाख 50 हजार 928 दशलक्ष लिटर पाणी साठा आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेने 40 हजार दशलक्ष लिटर पाणी कमी आहे. मात्र, उपलब्ध पाणीसाठा ऑगस्ट महिन्यापर्यंत पुरणार आहे. त्याचबरोबर मान्सून लवकर सुरु असल्याने यंदा पाणी कपातीचे संकट येण्याची शक्यता कमी आहे. मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये 13 एप्रिलपर्यंत 4 लाख 91 हजार 756 दशलक्ष लिटर पाणीसाठा होता. तर, यंदा 4 लाख 50 हजार 928 दशलक्ष लिटर पाणीसाठा उपलब्ध आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा 40 हजार म्हणजे जवळ जवळ दहा दिवसांची पाणीसाठा कमी आहे. पण, उपलब्ध पाणीसाठा ऑगस्टच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत पुरणार असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.

सावधान! मुंबई लोकलमध्ये बनावट ओळखपत्र घेऊन चुकूनही जाऊ नका अन्यथा...

केंद्रीय वेधशाळेने यंदा मान्सून लवकर दाखल होऊन सरासरी पेक्षा जास्त पावसाची शक्यता वर्तवली आहे. त्यामुळे पाणी कपात करण्याची गरज भासण्याची शक्यता कमी असल्याचे पालिकेच्या जलअभियंता विभागाच्या अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले आहे. सध्या अप्पर वैतरणामध्ये 75 हजार 726, मोडकसागरंमध्ये 44 हजार 653, तानसामध्ये 31 हजार 627, मध्य वैतरणामध्ये 43 हजार 228, भातसामध्ये 2 लाख 37 हजार 551, विहारमध्ये 14 हजार 257 आणि तुलसीमध्ये 3 हजार 841 दशलक्ष लिटर पाणीसाठी सध्या शिल्लक आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com