Mumbai Water Cut : मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात तलावांमध्ये आज सकाळी सहापर्यंत १४,०५,१९० दशलक्ष लिटर म्हणजेच ९७.०७ टक्के जलसाठा जमा झाला आहे. ३६४ दिवस तो पुरणार असल्याने मुंबईकरांना दिलासा मिळाला आहे.
गेल्या आठवड्यात मुंबईत दोन दिवस जोरदार पाऊस पडला. तलावांच्या पाणलोट क्षेत्रातही चांगल्या सरी बरसल्या. त्यानंतर अधूनमधून संततधार सुरू आहे. सकाळपासून पावसाच्या हलक्या सरी पडत आहेत. सध्याच्या पावसाने तलावांच्या पाण्यात वाढ झाली आहे. तलावांमध्ये ३६४ दिवस पुरेल इतका पाणीसाठा असल्याने वर्षभराची चिंता मिटली आहे. मुंबईकरांवरील पाणीकपातीचे संकटही दूर झाले आहे. अजूनही मुंबईत आणि तलाव क्षेत्रात ढगाळ वातावरण असून हवामान खात्याने पावसाची शक्यता वर्तवली आहे.
मुंबईत जुलैमध्ये पुरेसा पाऊस झाला; मात्र पूर्ण ऑगस्ट महिना कोरडा गेला. दहीहंडी उत्सवाच्या दिवशी पावसाने दमदार हजेरी लावली. दुसऱ्या दिवशीही चांगला पाऊस झाला. महिनाभर पावसाने ओढ दिल्याने मुंबईकरांवर पाणीकपातीचे संकट निर्माण झाले होते. परिणामी तलावांतील पाणीसाठा घटल्याने १० ते २० टक्के पाणीकपातीचा प्रस्ताव आयुक्तांकडे पाठवला जाणार होता; मात्र आता तशी वेळ येणार नाही, असे पालिकेच्या जलअभियंता विभागाने स्पष्ट केले आहे.
अप्पर वैतरणा ६०३.५१ ५०२.८१
मोडकसागर १६३.१५ १६३.००
तानसा १२८.६३ १२८.५३
मध्य वैतरणा २८५.०० २८४.१३
भातसा १४२.०७ १४१.६०
विहार ८०.१२ ८०.१९
तुळशी १३९.१७ १३९.१९
- सात तलावांत १४,०५,१९० दशलक्ष लिटर पाणी
- एकूण पाणीसाठा ः९७.०७ टक्के
- जलसाठा ः ३६४ दिवस म्हणजे १२ सप्टेंबर २०२४ पर्यंत पुरणार
- विहार आणि तुळशी ः १०० टक्के
- मोडक सागर ः ९९.५२ टक्के
- तानसा ः ९८.६९ टक्के
- भातसा ः ९८.२० टक्के
- मध्य वैतरणा ः ९७.६८ टक्के
- अप्पर वैतरणा ः ९०.१९ टक्के
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.