व्यापाऱ्यांची नाजूक स्थिती, उद्धव ठाकरेंना केली कळकळीची विनंती

३१ मे रोजी दुकाने बंद करुन ५५ दिवस होतील.
व्यापाऱ्यांची नाजूक स्थिती, उद्धव ठाकरेंना केली कळकळीची विनंती

मुंबई: मुंबईतील व्यापारी संघटनेने (Mumbai traders) १ जून नंतर राज्य सरकारने दुकाने उघडण्यासाठी परवानगी द्यावी अशी मागणी केली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (uddhav thackeray) यांना काल, अनलॉक (unlock) बद्दल प्रश्न विचारण्यात आला. त्यावर त्यांनी, अजून काही ठरलं नसल्याचं उत्तर दिल्याचं माध्यमांमधून आम्हाला समजलं. त्यानंतर आज व्यापाऱ्यांचे नेते विरेन शहा (viren shah) यांनी सरकारने दुकानं उघडण्याची परवानगी द्यावी अशी मागणी केली आहे. (Mumbai traders codition is very bad request to cm uddhav thackeray to allow open shops from 1st june)

"व्यापाऱ्याची स्थिती अत्यंत खराब आहे, नाजूक आहे. ३१ मे रोजी दुकाने बंद करुन ५५ दिवस होतील. १३ लाख दुकानं बंद आहेत. चार व्यक्ती पकडल्या, तर ५० लाख रोजगार अडचणीत आहेत. कुटुंबांनाही पकडलं, तर २ कोटी लोकांकडे आज महाराष्ट्रात घर चालवण्यासाठी पैसे नाहीत. सरकारला याचा विचार करावा लागेल" असे विरेन शहा म्हणाले. "

"अशा प्रकारचा लॉकाडउन संपूर्ण भारतात, इतका लांब लॉकडाउन मागच्या १४ महिन्यात कुठेही झालेला नाही. महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात अशी स्थिती आहे, सरकारने यावर विचार केला पाहिजे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, शरद पवार आणि अस्लम शेख या सगळ्यांबरोबर आमची चर्चा झाली आहे. १ जून नंतर राज्य सरकारने दुकाने उघडण्यासाठी परवानगी द्यावी" अशी मागणी विरेन शहा यांनी केली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com