मुंबईकर घेतायत सुखद गारव्याचा आनंद, किमान तापमानात घट

मुंबईकर घेतायत सुखद गारव्याचा आनंद, किमान तापमानात घट

मुंबई: राज्यभरात किमान तापमानात घट झाली असून अनेक जिल्ह्यांमध्ये किमान तापमान नोंदवण्यात आले. मुंबईतील किमान तापमान 22 अंशावर आले असून सुखद गारव्याचा अनुभव मुंबईकर घेत आहेत. 

राज्यात आज किमान तापमानाची नोंद झाली. राज्यातील सर्वाधिक किमान तापमान नाशिक येथे 10 अंश सेल्सियस इतके नोंदवण्यात आले. त्या खालोखाल जळगाव येथे 10.4 किमान तापमान नोंदवण्यात आले. पुणे,जालना आणि मालेगाव  येथे किमान तापमानात घट झाली आहे.

उत्तर भारतासह काश्मीर मध्ये थंडीची लाट पसरली आहे. परिणामी दोन दिवसांपासून उत्तर तसेच मध्य महाराष्ट्रासह विदर्भातील काही परिसरात किमान तापमानात घट झाली. पुढील 48 तास हे वातावरण कायम राहणार असल्याचे शक्यता मुंबई प्रादेशिक हवामान विभागाने वर्तवली आहे. 

मुंबई विभागातल्या ताज्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
 
नाशिक -10 
जळगाव - 10.4
पुणे - 10.8
जालना - 11
मालेगाव - 11.2 
Baramati 11.3 
परभणी - 12.4,
महाबळेश्वर - 13.6
औरंगाबाद - 12.5, 
मुंबई - 22

-------------------------------

(संपादन- पूजा विचारे)

mumbai weather updates minimum temperature in Mumbai reached 22 degrees

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com