विरार - नुकत्याच झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत नालासोपारा मतदार संघातून निवडून आलेले राजन नाईक हे सामवेदी समाजातील पहिले आमदार ठरले आहेत. यापूर्वी या समाजातील बबन शेठ नाईक हे ठाणे जिळ परिषदेचे अध्यक्ष होते..वसईच्या पश्चिम पट्टयात जवळपास २० ते २२ हजार लोकसंख्या असलेल्या सामवेदी समजला प्रथमच भाजपकडून राजन नाईक यांच्या रूपाने उमेदवारी मिळाली होती. या निवडणुकीत राजन नाईक यांनी आमदारकीची हॅट्रिक केलेल्या क्षितिज ठाकूर यांचा ३० हजार मतांनी पराभव केला होता..वसईच्या किनारपट्टीवर राहणार सामवेदी समाज हा वाडीकरणारा समाज म्हणून ओळखलं जातो, या समाजाची ह्या भागात जेमतेम २० ते २२ हजार लोकसंख्या असेल. पूर्वी हा समाज काँग्रेस बरोबर होता. तरी यातील मोठया प्रमाणात rss आणि विश्वहिंदू परिषदेला माननारीनची सारख्या मोठी आहे..यापूर्वी हितेंद्र ठाकूर यांच्या बहुजन विकास आघाडीतून बबनशेट नाईक याना राज्यमंत्र्याचा दर्जा असलेले ठाणे जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद देण्यात आले होते. परंतु लोकांमधून निवडून आलेला सामवेदी समाजाचा पहिला आमदार राजन नाईक ठरले आहेत.#ElectionWithSakal.सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.