Navi Mumbai: बर्ड फ्लूमुळे शेतकऱ्यांच्या पोटावर पाय, कोंबड्या मारण्याच्या निर्णयामुळे चिंतेत वाढ   

Uran Bird Flu News: अनेक जण घरगुती कुक्कुटपालनदेखील करतात. कोणत्याही प्रकारचे बाजारातले खाद्य न देता देशी पद्धतीचे खाद्य या कोंबड्यांना दिले जाते.
Navi Mumbai: बर्ड फ्लूमुळे शेतकऱ्यांच्या पोटावर पाय, कोंबड्या मारण्याच्या निर्णयामुळे  चिंतेत वाढ   
Updated on


उरण, ता. २१ (बातमीदार) : गेल्या चार दिवसांपासून उरण तालुक्यातील चिरनेरसह परिसरात पसरलेल्या बर्ड फ्लूमुळे सर्वच जण भीतीच्या छायेत आहेत. हा रोग केवळ एकाच गावात आला असला तरी जिल्हा प्रशासनाने परिसरातील गावांतील कोंबड्या मारण्याचे आदेश दिल्यामुळे बाधा न झालेल्या कोंबड्याही ठार केल्या जात आहेत.

त्यामुळे देशी कोंबडी व त्यांची अंडी हेच मुख्य उत्पन्नाचे साधन असलेले शेतकरी हवालदिल झाले आहेत. रोजचे उत्पन्नच बंद झाल्यामुळे त्यांच्यावर मोठे आर्थिक संकट ओढवले आहे.
उरण तालुक्यातील ग्रामीण भागात घरोघरी, फार्म, वाड्या-वस्त्यांवर मोठ्या प्रमाणात कुक्कुटपालन होते. पूर्वी फक्त घरोघरी देशी कोंबड्या पाळल्या जात होत्या; मात्र आता या घरगुती व्यवसायाला मोठ्या व्यवसायाचे रूप देऊन कुक्कुटपालन वाढविण्याकडे शेतकऱ्यांचा कल आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com