आणखी किती संकटांना तोंड द्यायचं मुंबईकरांनी? 'या' गैरसोयीसाठीही राहावं लागणार तयार

आणखी किती संकटांना तोंड द्यायचं मुंबईकरांनी? 'या' गैरसोयीसाठीही राहावं लागणार तयार


मुंबई: जुन महिना कोरडा गेल्यामुळे मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये 7.61 टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. 2018 नंतरची हि सर्वात कमी पातळी आहे. सध्या धरणांमध्ये एक लाख 10 हजार 98 दशलक्ष लिटर पाणीसाठा जमा आहे. आता केवळ महिन्या भराचा पाणीसाठा शिल्लक आहे.

ठाणे जिल्ह्यातील मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणांच्या परीसरात जूनच्या दुसऱ्या पंधरावड्यात पाऊस जोर धरतो. यंदा जून महिना कोरडाच गेला आहे. मुंबईला वर्षभर पाणी पुरवठ्यासाठी 14 लाख 47 हजार 363 दशलक्ष लिटर पाण्याची गरज असते. मात्र, यंदा अद्याप एक लाख 10 हजार दशलक्ष लिटर पाणीसाठा जमा आहे. तर 2018 मध्ये तीन लाख 10 हजार 934 दशलक्ष लिटर 21.48 टक्के, 2019 मध्ये 1 लाख 69 हजार 786 दशलक्ष लिटर  11.73 टक्के पाणीसाठा जमा होता.

अप्पर वैतरणा धरणात शून्य टक्के उपयुक्त पाणीसाठा जमा आहे. तर तानसा मध्ये 9 टक्के आणि शहराला सर्वाधिक पाणी पुरवठा करणाऱ्या भातसा धरणात 6.05 टक्के पाणीसाठा जमा आहे. मध्य वैतरणात 10.69 टक्के आणि मोडकसागर मध्ये 19 टक्के, विहार मध्ये 19.99 टक्के आणि तुसली मध्ये 29.52 टक्के पाणीसाठा जमा आहे.

पाणीसाठा दशलक्ष लिटर मध्ये 
 

धरण  उपलब्ध पाणीसाठा एकूण पाणीसाठी 
अप्पर वैतरणा   00       2,27,047
मोडकसागर    24,609    1,28,925
तानसा  13,488      1,45,080
मध्य वैतरणा  20,681  1,93,530
भातसा         43,407       7,17,037
विहार     5,537      27,698
तुसली     2,375     8,046

only Seven percent of the water in the dams is enough for a month

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com