
कल्याण : लॉकडाऊनमुळे रिक्षा, टॅक्सी चालकांवर उपासमारीची वेळ आली आहे. जून महिन्यात मुलांचे शाळा कॉलेज सुरू होणार असुन तो खर्च कसा करायचा ? अनेक प्रश्न रिक्षा चालकांना पडला आहे. त्यामुळे आता तरी काही काळ रिक्षा टॅक्सी चालवू द्या अशी मागणी कोकण विभाग रिक्षा टॅक्सी महासंघ अध्यक्ष प्रकाश पेणकर यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे.
लॉकडाऊन मार्च महिन्याच्या अखेरीस सुरू झाला त्याचे स्वागत करत सर्वांनी पाठींबा दिला यात कल्याण-डोंबिवली सहित राज्यातील रिक्षा आणि टॅक्सी चालक ही सहभागी झाले. अनेक रिक्षा आणि टॅक्सी चालक भाड्याने घर घेऊन रहात असून कसा बसा मार्च एप्रिल आणि मे महिना काढला. आता जून महिना सुरू झाला असून आता रिक्षा चालकांचा संयम सुटू लागला आहे. राज्य शासनाने मदत द्यावी अशी मागणी ही झाली, मात्र शासनाने दुर्लक्ष केल्याने रिक्षा आणि टॅक्सी चालक हतबल झाले आहेत. जून महिन्यात मुलांच्या शाळा आणि कॉलेज सुरू होणार असून तो खर्च कसा भागवणार याची चिंता रिक्षा टॅक्सी चालकांना लागली आहे. त्यामुळे काही काळ तरी रिक्षा टॅक्सी चालवू द्या अशी प्रकाश पेणकर यांनी ठाकरे यांच्याकडे केली आहे.
रिक्षा चालकांनी गाव गाठले
लॉकडाऊन काळात रिक्षा व्यवसाय बंद असल्याने घराचे भाडे द्यायचे , घर खर्च करायचा कसा , आर्थिक संकटात सापडलेल्या अनेक रिक्षा चालकांनी आपले गाव गाठले. यात उत्तर प्रदेश , मध्य प्रदेश मधले असले तर राज्यातील मराठी रिक्षा चालकांनीही आपल्या कुटुंबासहित रिक्षा ने नगर , नाशिक, पुणे मधील आपल्या गावाकडे गेले असल्याची माहिती कोकण विभाग रिक्षा टॅक्सी महासंघ सदस्य जितेंद्र पवार यांनी दिली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.