

raj thackeray
esakal
मुंबईत महाविकास आघाडी आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) यांनी निवडणूक आयोगाविरोधात भव्य मोर्चा काढण्यात आला. हा 'सत्याचा मोर्चा' दुबार मतदार, बनावट मतदार आणि मतदारयादीतील त्रुटींवर केंद्रित होता. मोर्चानंतर झालेल्या सभेत मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी निवडणूक आयोगावर गंभीर आरोप करत पुराव्यांचा पाढाच वाचला. "जोपर्यंत मतदारयादीतील दोष दूर होत नाहीत, तोपर्यंत निवडणूका घेऊ नका," अशी थेट मागणी त्यांनी केली.