प्रचाराच्या शेवटच्या दिवशी राज ठाकरे यांच्या दोन सभा होतायत. यातील नवी मुंबईतील सभा रिमझिम पावसात पार पडली. नवी मुंबईतील सभेत राज ठाकरे यांनी परप्रांतीयांच्या मुद्द्यावरून सरकारवर तोफ डागली. मुंबई, महाराष्ट्रात बाहेरून लोंढेच्या-लोंढे येतायत. या बाहेरून येणाऱ्या लोंढ्यामुळे संपूर्ण राज्याचं समीकरण बिघडतंय. दररोज बाहेरचे लोंढे इथे येतायत. त्यामुळे भूमिपुत्रांऐवजी त्यांच्यवर खर्च होतो. त्यामुळे राज्यावर खर्चाचा ताण येतोय. यावर सरकार काहीही करत नाही आणि त्यांना कुणी जाब विचारायला तयार नाही. या शब्दात राज ठाकरे यांनी परप्रांतीयांच्या लोंढ्यांच्या मुद्द्यावरून टीकास्त्र सोडलं. पाच वर्षानंतर आताच का हिच ती वेळ असा सवाल राज ठाकरेंनी उपस्थित केलाय.
प्रचाराच्या शेवटच्या दिवशी नवी मुंबईत राज ठाकरे यांनी पावसात तोफ धडाडली. मुंबईत सगळीकडेच पावसाची रिमझिम सुरु असताना राज ठाकरेंची सभा होते की नाही याकडे सगळ्यांचं लक्ष होतं. नवी मुंबईतील सभेत राज ठाकरेंनी पुन्हा एकदा सरकार आणि सरकारी कामकाजावर चौफेर टीका केली. राज्यात विरोधी बाकावर ताठ कण्याचा पक्ष बसणार नाही तोवर, सगळं सुरळीत होणार नाही.
WebTitle : raj thackeray navi mumbai public speech targets outsiders
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.