वारकरी आणि कोळी बांधवांचे प्रतिनिधी राज दरबारी दाखल; अडचणी आणि मागण्यांचा वाचला पाढा

वारकरी आणि कोळी बांधवांचे प्रतिनिधी राज दरबारी दाखल; अडचणी आणि मागण्यांचा वाचला पाढा

मुंबई - लॉकडाऊन सुरू झाल्यापासून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याकडे अनेक संघटना आणि व्यक्तींना आपल्या अडचणी सोडवण्यासाठी धाव घेतली आहे. कोळी वाड्यासंदर्भातील मागण्या घेऊन आजही आगरी कोळी बांधवांनी राज ठाकरे यांची भेट घेतली.

कोरोना काळात अनेक संघटना आणि लोकांनी आपल्या अडचणी सोडवण्यासाठी कृष्णकुंज या राज ठाकरे यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली होती. वाढीव विजबिले, मुंबईतील डबेवाले, रिक्षाचालक संघटना, विद्यार्थी पालक संघटना, रेल्वे प्रवासी संघटना, जीम मालक, केबलचालक अशा अनेकांनी आपले गऱ्हाने राज ठाकरेंकडे मांडले आहे. राज यांनी देखिल ते सोडवण्यासाठी राज्य सरकारकडे वेळोवेळी पाठपुरावा केला आहे. आज देखील मुंबईतील कोळीवाड्याच्या प्रश्नावरून कोळी बांधवांनी, कार्तिकी एकादशीला पंढरपुरमधली संचारबंदी हटवली जावी यासाठी वारकऱ्यांनी तसेच मुंबई ठाण्यातील बॅंड पथकांच्या प्रतिनिधीनी राज ठाकरेंची भेट घेतली. 

कोळीवाडे हे मुंबईत असले तरी, ती गावेच आहेत. त्यांच्या सिमांकनाचा प्रश्न महापालिकेकडे प्रलंबित आहे. कोळीवाड्याला गावठान हक्क द्यावा अशी मागणी कोळी बांधवांनी केली आहे. कोळीवाडे बिल्डरांच्या घशात घालण्याचा डाव असल्याचा आरोपही कोळी बांधवांनी यावेळी केला. कोळी बांधवांचा हा प्रश्न राज कशा पद्धतीने सोडवतात हे पाहणं औत्सुक्याचे ठरणार आहे.

----------------------------------------------------

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com