
कोरोना झाल्यानंतरही 50 वर्षांच्या पुढे असणाऱ्या आणि अतिजोखमीचे आजार असणाऱ्या रुग्णांच्या प्रकृतीला अधिक धोका असल्याचे एका अभ्यासात आढळून आले आहे.
मुंबई : कोरोना झाल्यानंतरही 50 वर्षांच्या पुढे असणाऱ्या आणि अतिजोखमीचे आजार असणाऱ्या रुग्णांच्या प्रकृतीला अधिक धोका असल्याचे एका अभ्यासात आढळून आले आहे. त्यामुळे कोरोनाच्या उपचारादरम्यान आणि त्यानंतरही रुग्णाच्या शरीरातील रक्त, ऑक्सिजनची पातळी कायम तपासण्याची गरज वैद्यकीय तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.
नववी-बारावीचे वर्ग सुरू! 40 मिनिटांच्या चार तासिका, मोकळ्या जागेत वर्ग घेण्यास मुभा
इंडियन जर्नल ऑफ मेडिकल रिसर्चच्या अहवालानुसार, कोरोना झालेल्या 60 ते 70 टक्के रुग्णांना वेगवेगळ्या हृदयविकारांचा धोका असतो. त्याचप्रमाणे पूर्वीपासून अतिजोखमीचे आजार असलेल्या रुग्णांच्या प्रकृतीत अधिक गुंतागुंत निर्माण होऊ शकते. शिवाय रक्ताच्या गुठळ्यांचेही आजार होऊ शकतात. मुंबईत पालिकेच्या सायन, केईएम आणि नायर रुग्णालयांत पोस्ट कोव्हिड उपचार घेणाऱ्या रुग्णांचे प्रमाण 40 टक्के आहे, तर खासगी रुग्णालयांमधील बाह्यरुग्ण विभागात हे प्रमाण 12 टक्के आहे.
नायर रुग्णालयाच्या पोस्ट कोव्हिड ओपीडीमध्ये दिवसाला जवळपास 10 ते 12 रुग्ण येतात. त्यात बऱ्याचदा 35 हून अधिक वयोगटातील रुग्णांचा समावेश आहे. या विभागात उपचार घेणाऱ्या रुग्णांमध्ये मधुमेह, हृदयविकार, रक्तदाब आणि स्थूलपणा यांसारखे आजार असणारे रुग्ण अधिक आहेत.
- डॉ. रमेश भारमल,
अधिष्ठाता, नायर रुग्णालय
काय त्रास होतो?
Risk of other diseases after coronation Medical experts advise to check blood and oxygen
----------------------------------------------------------------
( संपादन - तुषार सोनवणे )