लॉकडाऊनमध्ये पायीच निघालेले गावाकडे आणि कोरोनाने असाही घेतला जीव...

लॉकडाऊनमध्ये पायीच निघालेले गावाकडे आणि कोरोनाने असाही घेतला जीव...

मुंबई : कोरोनामुळे जगभरातले काही देश पूर्णतः लॉकडाऊन करण्यात आले आहेत. भारतीतही २४ मार्च ते १४ एप्रिल दरम्यान संचारबंदी असणार आहे. सर्व रेल्वेगाड्या, विमानं आणि वाहतुकीच्या सुविधा बंद करण्यात आल्या आहेत. त्यामुळे काही लोकं चक्क पायी चालत आपल्या घरी निघाले  आहेत. मात्र हे पायी घरी जाणं ७ जणांच्या जीवावर बेतलं आहे.

मुंबई अहमदाबाद महामार्गावर पायी निघालेल्या ७ जणांना एका टेम्पोने उडवलं. या भीषण अपघात ४ जणांचा जागीच मृत्यू झाला तर ३ जण गंभीर जखमी झाले आहेत. वाहनांना बंदी असल्यामुळे हे मजूर पायीच प्रवास करत होते.

जखमींपैकी एकाची प्रकृती चिंताजनक आहे. हे सर्व प्रवासी देशात संचारबंदी सुरू असल्यामुळे आपल्या घरी जात होते. हे सर्व मजूर गुजरातला जात होते.  संचारबंदी असल्यामुळे सर्व राज्यांच्या सीमा बंद करण्यात आल्या आहेत. त्यामुळे चालत हे मजूर गुजरात सीमेवर पोहोचले खरे, मात्र गुजरातकडची हद्द बंद असल्यामुळे त्यांना परत पाठवण्यात आलं. नाईलाजास्तव त्यांना परत मुंबईची वाट धरावी लागली.

वसईच्या दिशेनं परत येत असताना महामार्गावर एका भरधाव वेगात येणाऱ्या टेम्पोनं या सातही जणांना जोरदार धडक दिली. यात ४ जणांचा जागीच मृत्यू झाला तर ३ जण गंभीर जखमी झाले आहे. विरार हद्दीतल्या भारोल परिसरात ही घटना घडली.

या अपघातातील २ जणांची ओळख पटली असून ५ जणांची ओळख अद्याप पटलेली नाही. ओळख पेटलेल्यांपैकी एकाचं नाव कल्पेश जोशी वय ३२ तर दुसऱ्याचं नाव मयांक भट वय ३४ असं आहे. त्यामुळे पायी घरी जाऊन स्वतःचा जीव वाचवण्याच्या नादात या मजुरांना जीव गमवावा लागला आहे.

seven people lost life while walking towards their hometome during lockdown 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com