तर मग देशात घोषित आणिबाणी आहे का? उद्धव ठाकरे यांचा फडणवीसांना सवाल

तर मग देशात घोषित आणिबाणी आहे का? उद्धव ठाकरे यांचा फडणवीसांना सवाल

मुंबई - राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन सोमवार पासून मुंबईत सुरू होत आहे. अधिवेशनाच्या पूर्वसंधेला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी अधिवेशनाची रुपरेखा सांगितली आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या प्रश्नांनाही उत्तरे दिली.

हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वसंघेला राज्याच्या कॅबिनेट मंत्रिमंडळाची बैठक संपन्न झाली. त्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. हिवाळी अधिवेशनामध्ये सहा अध्यादेश पटलावर ठेवण्यात येणार आहेत. त्यासोबतच पुरवणी मागण्या आणि विनियोजन बील मंजूर करण्यात येणार आहेत. सोमवारी शोकप्रस्ताव मांडण्यात येणार आहे. अशा पद्धतीने या दोन दिवसीय अधिवेशनाची रुपरेखा असणार आहे.

विरोधकांचं मागील वर्ष सरकार पाडण्याचं मुहूर्त पाडण्यात गेले. राज्यात जर अघोषित आणिबाणी असेल तर, केंद्रात-देशात घोषित आणिबाणी आहे का? विरोधी या शब्दाला भाजपला जागावे लागेल त्यामुळे त्यांच्या टीका या त्यांच्या जागी असू देत असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले.

So is there a state of emergency in the country? Uddhav Thackerays question to Fadnavis

-----------------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com